शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

का नाही

संपुर्ण फलटण तालुका सध्या वाढत्या चोऱ्‍यांनी हैरान झालाय. आता यातल्या खऱ्‍या किती व अफवा किती हे समजत नाही. पण रोज काहीतरी ऐकण्यास भेटतय. आज इथे युवकास अडवून मारहाण, तर काल रात्री एका महिलेस लुटले अशा एक ना अनेक. कोणीतरी 'बाहेर'चे लोक येवून या चोऱ्‍या करत आहेत असाही एक समज आहे, अर्थात ही देखिल अफवाच असेल यात शंकाच नाही. एकंदरीत भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री सातनंतर घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत.
का होतयं अस.?
वाढती महागाई, तरुणांमधील वाढती बेरोजगारी, एकूणच चाललेले स्वार्थी राजकारण, त्यातच भरीसभर सरकारने थांबवलेली भरती.
मग फक्त अशिक्षीत तरुणच नव्हे तर चांगले सुशिक्षीत तरुणही या वाममार्गास लागणारच. आपल्या थैल्या भरण्यासाठी निघालेल्या शैक्षणिक संस्था भरमसाट डोनेशन घेऊन पदवीचा कागद हाती देतात. अन् मग सुरु होतेय जिवघेणी स्पर्धा. ज्या काही थोड्या नोकऱ्‍या आहेत त्या आधीच 'अर्थपुर्ण' वशिल्याने भरुन भरतीचे नाटक केले जातय. या वातावरणात कर्जबाजारी होऊन शिक्षणाच्या कागदी पदव्या घेणारा युवक मग आणखी काय करणार.
स्वप्न पाहतोय आपण २०२० साली देशाला महासत्ता बनवण्याचे. कस गाठणार आहोत हे ध्येय आपण. समाजातला एक मोठा वर्ग पोट भरण्याच्या विंवचनेत असताना. निराशावादाने नाही हे सांगत पण या कठोर सत्याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाहीच.
अन् हि तर सुरुवात आहे आणि जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर ते समाजासाठी घातकच ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा