गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

मी भारतीय...

आठवड्यापासुनच हि पोस्ट टाकायचे ठरवत होतो पण "आज राहु दे उद्या पाहु" या टिपीकल प्रज्योत पध्दतीने राहिलच.
आणखी तासाभरात बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल लागेल. दिर्घकालीन न्यायालयीन प्रकियेचे हे फलित असणार आहे. या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असं दोन्ही बाजुंचे म्हणणे आहे. सुदैवाने असच व्हावं.
पण वातावरणात काहीशी तणावपुर्ण शांतता जाणवतोय.
या संपुर्ण घडामोडीत एक सामान्य भारतीय म्हणुन माझ मत काय आहे.
न्यायालयाच्या निकालावर माझा पूर्ण विश्वास आहेच. पण मित्रानो या प्रकरणाकडे सकारात्मकपणे पाहता येईल. या वादग्रस्त जागी एखादे सर्वधर्मिय शांतता स्मारक उभारण्यात यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. खरच अस काहि घडलं तर आपल्याला भावी पिढीला अभिमानाने सांगता येईल की, "हम सब एक है" हे फक्त बोलण्यासाठी नसुन हे शांती स्मारक याच प्रतिक आहे. इथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नाही, मला फक्त एकच सांगायचय
भारताला महासत्ता बनण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवानीं सदैव एकत्र राहणे गरजेचे आहे.
निकाल काहीही लागला तरीही माझा "भारत हा एकोप्यानेच नांदेल" हा माझा एक भारतीय म्हणुन ठाम विश्वास आहे.


राम व अल्ला या दोघांनाही हिच प्रार्थना, "हम सब एक है" ही भावना आमच्या मनात युगेनयुगे अशीच राहु दे.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

होळी

तोडून मगरमिठी तमाची,
गाठली जेव्हा मी पहिली पायरी यशाची.
विचारणा होतीच साऱ्‍या जगाची,
पाहिलीस वाटेवर तू किरणे कोणत्या सुर्याची.
मुकी झाली वाणी..., संपली संपत्ती शब्दाची.
कसं सांगू जगाला.
काय गरज मला अशा काजव्याची....,
जर सोबतीला असेल पेटलेली होळी आयुष्याची.

चारोळी ८

हरलो जरी प्रत्येक लढा नियतीशी.
अखेरचा डाव मीच जिंकणार आहे.
हसत असतील सारे आज मला.
रडतील तेव्हा सारे,
अन् मी मात्र हसत हसत जाणार आहे.

सल

जमिनीवर पाठ टेकताना,
दिसायची सारी तारांगणे नजरेला.
पाणी पिताना असयाचीही कधी मीठभाकर तोंडी लावायला.
फेकायचे लोक चिंध्या चार,
कदाचित उघडा पाहुन मला, लाज वाटत असेल जगाला.
ना कोणती फिकीर ना कशाची तमा,
फक्त एकच सल आहे मनाला....,
एकपण दुःख कस येत नाही माझ्या वाट्याला.

चारोळी ७

विश्वास आहे गवसणी घालणार गगनाला.
सुरुवातही झालीय जग जिंकायला.
त्याचबरोबर शिकायचय मला,
मातीतले पाय मातीतच घट्ट करायला.

मेणबत्ती

अमावस्येच्या तिन्हीसांजेला,
विचारले सुर्याने अस्ताला जाताना.
कोण देईल प्रकाश माझ्यानंतर या जगाला.?
शांत होते सर्वजण...,
घाबरतच हात वर केला छोट्या मेणबत्तीने,
मी प्रयत्न करेन जमेल तेवढा आसमंत उजळवायला.

शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

आज कसोटी

मी प्रज्योत.
महिना होत आलाय आता मला BlOg लिहायला सुरुवात करुन.
आजवर फक्त चार ते पाच ओळीच्या चारोळ्या :-P किंवा मुक्त विचार लिहीतोय. थोडक्यात २०-२०. आणि ते देखिल Mobile वरुन लिहीत असल्याने काही मर्यादा येत आहेत.तरीही लिहण्याची ऊर्मी शांत बसू देत नाही ना.!
त्यासाठी आज प्रथमच कसोटीत उतरतोय.

आज फक्त एकलव्यबाबतच......
२७ डिसेँबर १९८८ ला टपकलोय या धरतीवर. तेव्हापासुन आजपर्यत ७९३३ दिवसात आलेले अनुभव, जे काही थोडफार वाचन केलय, त्याबद्दल मला जे वाटतय ते लिहण्याचा प्रयत्न म्हणजे एकलव्य होय.
गेल्या वर्षी आँगस्ट मधेच माझी प्रथम blog या प्रकाराशी ओळख झाली. तेव्हापासुन मलाही नेहमी वाटायच आपलाही Blog असावा.
अन् हे चिमुकलं स्वप्न साकारले २२-८-२०१० ला. NOKIA 3110 Mobile वर opera mini वापरताना, त्या जाळ्यात(NET) भटकताना पाहता पाहता एकलव्य तयार झाला. खरच विश्वास नव्हता बसला की, माझा Blog तयार झालाय याच्यावर. त्यानंतर दोन दिवस मग नक्की कोणती पोस्ट टाकायची या विचारातच घालवले. अन मग सुरुवात झाली एकलव्यास.

आपला blog कोणी वाचेल का.? हा विचार मी कधीच करत नाही, कारण मला फक्त माझ्या चिमुकल्या डोक्यात विचाराची जास्त गर्दी करायची नाही, यासाठी हा साठा Blog वर टाकणार आहे. बस याच्यासाठीच लिहीतोय मी.

आणि हो इथे फक्त आणि फक्त माझेच विचार असतील.

कारण मला स्वर्गात जायचय,:-P मग एखाद्याच्या साहित्याच्या चोरीचे पाप करुन तो दरवाजा बंद करायचा नाही मला.

जाता जाता "एकलव्य" च्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्‍या $weet ला tnx.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०१०

पाऊस

चमकणाऱ्‍या वीजा,कोसळणाऱ्‍या धारा अन् बेभान तो वारा.
ओल्याचिंब देहाचा थंड शहारा.
नव्हे हा कोण्या वर्षासहलीचा नजारा,
शोधत होतो घरातच माझ्या पावसापासुन निवारा.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

ऊर्मिला

त्याग हिच ओळख आहे प्रेमाची,
किती चुकीची समज आहे जगाची.
रामायणे लिहिली इथे रामासह सितेच्या वनवासाची,
पण कोणी घेतली का साधी दखल ऊर्मिलेच्या विरहाची.

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

नारळ

दोन तास थांबलो रांगेत, पुजा चालु होती कोण्या राजाची.
मला मात्र दिसलीही नाही, गाभाऱ्‍यातील मुर्ती देवाची.
तोल सावरता सावरता, ऐकली वाणी पुजाऱ्‍याची.
म्हणे एवढीच वेळ असते अर्ध्या नारळाची.