जमिनीवर पाठ टेकताना,
दिसायची सारी तारांगणे नजरेला.
पाणी पिताना असयाचीही कधी मीठभाकर तोंडी लावायला.
फेकायचे लोक चिंध्या चार,
कदाचित उघडा पाहुन मला, लाज वाटत असेल जगाला.
ना कोणती फिकीर ना कशाची तमा,
फक्त एकच सल आहे मनाला....,
एकपण दुःख कस येत नाही माझ्या वाट्याला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा