मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

होळी

तोडून मगरमिठी तमाची,
गाठली जेव्हा मी पहिली पायरी यशाची.
विचारणा होतीच साऱ्‍या जगाची,
पाहिलीस वाटेवर तू किरणे कोणत्या सुर्याची.
मुकी झाली वाणी..., संपली संपत्ती शब्दाची.
कसं सांगू जगाला.
काय गरज मला अशा काजव्याची....,
जर सोबतीला असेल पेटलेली होळी आयुष्याची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा