गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

मी भारतीय...

आठवड्यापासुनच हि पोस्ट टाकायचे ठरवत होतो पण "आज राहु दे उद्या पाहु" या टिपीकल प्रज्योत पध्दतीने राहिलच.
आणखी तासाभरात बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल लागेल. दिर्घकालीन न्यायालयीन प्रकियेचे हे फलित असणार आहे. या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असं दोन्ही बाजुंचे म्हणणे आहे. सुदैवाने असच व्हावं.
पण वातावरणात काहीशी तणावपुर्ण शांतता जाणवतोय.
या संपुर्ण घडामोडीत एक सामान्य भारतीय म्हणुन माझ मत काय आहे.
न्यायालयाच्या निकालावर माझा पूर्ण विश्वास आहेच. पण मित्रानो या प्रकरणाकडे सकारात्मकपणे पाहता येईल. या वादग्रस्त जागी एखादे सर्वधर्मिय शांतता स्मारक उभारण्यात यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. खरच अस काहि घडलं तर आपल्याला भावी पिढीला अभिमानाने सांगता येईल की, "हम सब एक है" हे फक्त बोलण्यासाठी नसुन हे शांती स्मारक याच प्रतिक आहे. इथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नाही, मला फक्त एकच सांगायचय
भारताला महासत्ता बनण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवानीं सदैव एकत्र राहणे गरजेचे आहे.
निकाल काहीही लागला तरीही माझा "भारत हा एकोप्यानेच नांदेल" हा माझा एक भारतीय म्हणुन ठाम विश्वास आहे.


राम व अल्ला या दोघांनाही हिच प्रार्थना, "हम सब एक है" ही भावना आमच्या मनात युगेनयुगे अशीच राहु दे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा