शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

चारोळी

आवडत मला नेहमीच आव्हानं स्विकारायला.
जे आहे असाध्य ते साध्य करायला.
हारजीत काय चालणारच,
पण बर वाटतं अंगातली रग जिरवायला.

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

सावधान

टाळलं नाही एकही,
अंगावर घेतलय प्रत्येक वादळाला,
अखेर गाठलही भुमीला,
पण मंजुर नसावं हे त्या वेड्याला,
म्हणूनच दुर लोटलस का मला,

चल हरकत नाही.!
पुन्हा तयार आहे मी लढायला.


फक्त सावध रहा आता,
येतोय मी,



किनाराच उध्वस्त करायला.

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

मला भेटणार न...?

एक मस्त पार्टी आहे...
आणि त्यातील छानशी जेवणाची पंगत. ताटातल्या पदार्थाचा दुरवर घमघमाट सुटलाय. इथे येणे बऱ्‍याच जणांचं स्वप्न आहे.
पण
मोजक्याच जागा आहेत भोजनगृहात.
प्रवेश मिळवणं हेच पराकोटीच काम आहे. मलाही जायच होतं या ठिकाणी.
या गर्दीत भलेभले अडकलेत, तरीही हे शिवधनुष्य पेलत आत आलोच अखेर.

वाढलीत मस्त चकाचक ताटे. दिसतय बाजुला भरगच्च वाढलेलं.
बाहेरच्यांना हेवा वाटतोय माझा. आता मिही हात धुवून वाट पाहतोय ताटात जेवण येण्याची.?
खरतर जेवण्यासाठी माझी आत बसण्याची जागा वेगळी असताना, यजमानांच्या सोईसाठी दुसऱ्‍याच ओळीत बसवलय .
यामुळे मघाशी दाराजवळ माझ्यामागे असणारे ही जेवायला लागलेत.
अन् मी मात्र पाहतोय बापुडा आशेवर लवकरच आपल्याला ही मिळेलच.

आणि हळुच कानावर येतेय यातुनही जागा कमी होतील.

काय होईल अवस्था...,
पुरेपुर जगतोय...,
नव्हे कोणत्याच शब्दात नाही सांगता येत काय होतय ते....,
आता हे स्वप्न कधी भेटेल नव्हे तर नक्की भेटणार न हा प्रश्न सतावतोय.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

इशारा

पुन्हा इशारा त्या वेड्या नियतीला,
कुंपणाची भिती असेल सरड्याला.
असेल शक्य तर दाखवच अडवून आता,
या "ठिणगी"त पेटलेल्या वादळाला.

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

परत तेच

परत तोच काळाकुट्ट अंधार....,
हवेत पसरलाय तोच गारवा...,
रातकिड्यांची तीच ती अखंड किरकीर...,
वाऱ्‍याच्या मंद झुळकीसरशी होणारी पानांची सळसळही तीच...,
दिव्याच्या काजळीची छतावर फिरणारी नक्षी....,
मधुनच ओरडणारा चुकार पक्षी....,
नीरव शांततेला चिरुन टाकतोय वेडा...,
केवढा भयाण आवाज करतेय घड्याळाची टिकटिक....,
सहन नाही होत तीच ती छातीतली धकधक....,
दुरवर ऐकु येतोय आगगाडीचा तोच आवाज....,
म्हणजे तीन वाजलेच आजही....,
पाचसहा वर्षांपासुन असचं चाललय आयुष्य आपलं...., ह्रद्याचे ठोके ऐकत पडून राहणं..., परवापरवापर्यत पुस्तकांची साथ होती, मात्र आता तिही नाहीत...,
उरलेत फक्त...,
सताड उघडे डोळे अन् नजरेपुढून धावणारी अगणित स्वप्नं...,
सलतय मनात खोल कुठे...,
आस लागलीय सखे...
बस झाली आता ही प्रतिक्षा...,
वाट पाहतोय मी केव्हाचा.....,
कधी येणार तु......,
कधी येणार तु.........

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

का नाही

संपुर्ण फलटण तालुका सध्या वाढत्या चोऱ्‍यांनी हैरान झालाय. आता यातल्या खऱ्‍या किती व अफवा किती हे समजत नाही. पण रोज काहीतरी ऐकण्यास भेटतय. आज इथे युवकास अडवून मारहाण, तर काल रात्री एका महिलेस लुटले अशा एक ना अनेक. कोणीतरी 'बाहेर'चे लोक येवून या चोऱ्‍या करत आहेत असाही एक समज आहे, अर्थात ही देखिल अफवाच असेल यात शंकाच नाही. एकंदरीत भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री सातनंतर घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत.
का होतयं अस.?
वाढती महागाई, तरुणांमधील वाढती बेरोजगारी, एकूणच चाललेले स्वार्थी राजकारण, त्यातच भरीसभर सरकारने थांबवलेली भरती.
मग फक्त अशिक्षीत तरुणच नव्हे तर चांगले सुशिक्षीत तरुणही या वाममार्गास लागणारच. आपल्या थैल्या भरण्यासाठी निघालेल्या शैक्षणिक संस्था भरमसाट डोनेशन घेऊन पदवीचा कागद हाती देतात. अन् मग सुरु होतेय जिवघेणी स्पर्धा. ज्या काही थोड्या नोकऱ्‍या आहेत त्या आधीच 'अर्थपुर्ण' वशिल्याने भरुन भरतीचे नाटक केले जातय. या वातावरणात कर्जबाजारी होऊन शिक्षणाच्या कागदी पदव्या घेणारा युवक मग आणखी काय करणार.
स्वप्न पाहतोय आपण २०२० साली देशाला महासत्ता बनवण्याचे. कस गाठणार आहोत हे ध्येय आपण. समाजातला एक मोठा वर्ग पोट भरण्याच्या विंवचनेत असताना. निराशावादाने नाही हे सांगत पण या कठोर सत्याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाहीच.
अन् हि तर सुरुवात आहे आणि जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर ते समाजासाठी घातकच ठरेल.

चारोळी ९

जपुन ठेवलय तुझ्या प्रत्येक आठवणीला.
नाही सांगत तुलाही असच वागायला.
मागायच आहे फक्त एवढच तुला.
तुझ्या सुंदर ह्रदयात एक छोटा कोपरा दे मला.

चारोळी ८

हिशोबच नाही भूतकाळ गमावण्याचा
मर्यादाही नाही भविष्य कमावण्याचा
का घालवायचा रस जीवनाचा
पुरेपुर लुटूया आनंद वर्तमान जगण्याचा

???

नक्की कोण आहे मी...?
जग (अर्थात छोट्या डबक्याबाबतच बोलतोय गैरसमज नको शब्दशः अर्थ घेउन ) ओळखतं मला प्रज्योत नावानं, तर आजवर झालेली माझी सर्व शैक्षणिक वाटचाल ज्ञानेश्वर पांडुरंग नाळे या नावाने झालीए.हो हे माझे खरे नाव आहे. तरी या नावाने मला ओळखणारी माणसे मोजण्यास एका हाताची बोटे अवश्य जास्त होतील.
पण आज थोडं वेगळ्या विषयावर बोलायचय.
मी आहे तरी कोण, हे जे लिहतोय त्यामागचे चैतन्य नक्की काय..? गेल्या पाच सहा महिन्यापासुन हा प्रश्न मनाला छळतोय. माझं असणं म्हणजे काय.....
हे जे सभोवती जाणवतय, ही सारी नाती,हे सारे बंध,सुख दूःख काय आहे हा सारा खेळ, अन् कोण खेळतोय तो.?
म्हटलं जात या सर्वामागे 'त्या'चा हात आहे. असेलही असच. पण जे काही पुराणात घडलय तेही इथेच, याच पृथ्वीतलावर घडलय. वंदनीय आहेतच ते सारे देव धर्म वगैरे. पण त्यांचाही निर्माता असेलच न कोणी.? कोण असणार तो..? यार मग हा सारा घोळ काय आहे नेमका. खरच मधुनमधून हा प्रश्न वळवळतोय या चिमुकल्या खोक्यात.

मग वेडा प्रयत्न करतोय मी, काय करायचयं या उत्तर अशक्य असणारा प्रश्न मनात घोळवत ठेवुन. नाहक का घालवायचा वेळ.
भेटलेले हे चिमुकले जीवन घालवूया जमेल तसा आनंद वाटत.
पण खरच कधी सापडेल का या चैतन्याच गुढ.....

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

मी भारतीय...

आठवड्यापासुनच हि पोस्ट टाकायचे ठरवत होतो पण "आज राहु दे उद्या पाहु" या टिपीकल प्रज्योत पध्दतीने राहिलच.
आणखी तासाभरात बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल लागेल. दिर्घकालीन न्यायालयीन प्रकियेचे हे फलित असणार आहे. या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असं दोन्ही बाजुंचे म्हणणे आहे. सुदैवाने असच व्हावं.
पण वातावरणात काहीशी तणावपुर्ण शांतता जाणवतोय.
या संपुर्ण घडामोडीत एक सामान्य भारतीय म्हणुन माझ मत काय आहे.
न्यायालयाच्या निकालावर माझा पूर्ण विश्वास आहेच. पण मित्रानो या प्रकरणाकडे सकारात्मकपणे पाहता येईल. या वादग्रस्त जागी एखादे सर्वधर्मिय शांतता स्मारक उभारण्यात यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. खरच अस काहि घडलं तर आपल्याला भावी पिढीला अभिमानाने सांगता येईल की, "हम सब एक है" हे फक्त बोलण्यासाठी नसुन हे शांती स्मारक याच प्रतिक आहे. इथे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नाही, मला फक्त एकच सांगायचय
भारताला महासत्ता बनण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवानीं सदैव एकत्र राहणे गरजेचे आहे.
निकाल काहीही लागला तरीही माझा "भारत हा एकोप्यानेच नांदेल" हा माझा एक भारतीय म्हणुन ठाम विश्वास आहे.


राम व अल्ला या दोघांनाही हिच प्रार्थना, "हम सब एक है" ही भावना आमच्या मनात युगेनयुगे अशीच राहु दे.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

होळी

तोडून मगरमिठी तमाची,
गाठली जेव्हा मी पहिली पायरी यशाची.
विचारणा होतीच साऱ्‍या जगाची,
पाहिलीस वाटेवर तू किरणे कोणत्या सुर्याची.
मुकी झाली वाणी..., संपली संपत्ती शब्दाची.
कसं सांगू जगाला.
काय गरज मला अशा काजव्याची....,
जर सोबतीला असेल पेटलेली होळी आयुष्याची.

चारोळी ८

हरलो जरी प्रत्येक लढा नियतीशी.
अखेरचा डाव मीच जिंकणार आहे.
हसत असतील सारे आज मला.
रडतील तेव्हा सारे,
अन् मी मात्र हसत हसत जाणार आहे.

सल

जमिनीवर पाठ टेकताना,
दिसायची सारी तारांगणे नजरेला.
पाणी पिताना असयाचीही कधी मीठभाकर तोंडी लावायला.
फेकायचे लोक चिंध्या चार,
कदाचित उघडा पाहुन मला, लाज वाटत असेल जगाला.
ना कोणती फिकीर ना कशाची तमा,
फक्त एकच सल आहे मनाला....,
एकपण दुःख कस येत नाही माझ्या वाट्याला.

चारोळी ७

विश्वास आहे गवसणी घालणार गगनाला.
सुरुवातही झालीय जग जिंकायला.
त्याचबरोबर शिकायचय मला,
मातीतले पाय मातीतच घट्ट करायला.

मेणबत्ती

अमावस्येच्या तिन्हीसांजेला,
विचारले सुर्याने अस्ताला जाताना.
कोण देईल प्रकाश माझ्यानंतर या जगाला.?
शांत होते सर्वजण...,
घाबरतच हात वर केला छोट्या मेणबत्तीने,
मी प्रयत्न करेन जमेल तेवढा आसमंत उजळवायला.

शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०

आज कसोटी

मी प्रज्योत.
महिना होत आलाय आता मला BlOg लिहायला सुरुवात करुन.
आजवर फक्त चार ते पाच ओळीच्या चारोळ्या :-P किंवा मुक्त विचार लिहीतोय. थोडक्यात २०-२०. आणि ते देखिल Mobile वरुन लिहीत असल्याने काही मर्यादा येत आहेत.तरीही लिहण्याची ऊर्मी शांत बसू देत नाही ना.!
त्यासाठी आज प्रथमच कसोटीत उतरतोय.

आज फक्त एकलव्यबाबतच......
२७ डिसेँबर १९८८ ला टपकलोय या धरतीवर. तेव्हापासुन आजपर्यत ७९३३ दिवसात आलेले अनुभव, जे काही थोडफार वाचन केलय, त्याबद्दल मला जे वाटतय ते लिहण्याचा प्रयत्न म्हणजे एकलव्य होय.
गेल्या वर्षी आँगस्ट मधेच माझी प्रथम blog या प्रकाराशी ओळख झाली. तेव्हापासुन मलाही नेहमी वाटायच आपलाही Blog असावा.
अन् हे चिमुकलं स्वप्न साकारले २२-८-२०१० ला. NOKIA 3110 Mobile वर opera mini वापरताना, त्या जाळ्यात(NET) भटकताना पाहता पाहता एकलव्य तयार झाला. खरच विश्वास नव्हता बसला की, माझा Blog तयार झालाय याच्यावर. त्यानंतर दोन दिवस मग नक्की कोणती पोस्ट टाकायची या विचारातच घालवले. अन मग सुरुवात झाली एकलव्यास.

आपला blog कोणी वाचेल का.? हा विचार मी कधीच करत नाही, कारण मला फक्त माझ्या चिमुकल्या डोक्यात विचाराची जास्त गर्दी करायची नाही, यासाठी हा साठा Blog वर टाकणार आहे. बस याच्यासाठीच लिहीतोय मी.

आणि हो इथे फक्त आणि फक्त माझेच विचार असतील.

कारण मला स्वर्गात जायचय,:-P मग एखाद्याच्या साहित्याच्या चोरीचे पाप करुन तो दरवाजा बंद करायचा नाही मला.

जाता जाता "एकलव्य" च्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्‍या $weet ला tnx.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०१०

पाऊस

चमकणाऱ्‍या वीजा,कोसळणाऱ्‍या धारा अन् बेभान तो वारा.
ओल्याचिंब देहाचा थंड शहारा.
नव्हे हा कोण्या वर्षासहलीचा नजारा,
शोधत होतो घरातच माझ्या पावसापासुन निवारा.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

ऊर्मिला

त्याग हिच ओळख आहे प्रेमाची,
किती चुकीची समज आहे जगाची.
रामायणे लिहिली इथे रामासह सितेच्या वनवासाची,
पण कोणी घेतली का साधी दखल ऊर्मिलेच्या विरहाची.

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

नारळ

दोन तास थांबलो रांगेत, पुजा चालु होती कोण्या राजाची.
मला मात्र दिसलीही नाही, गाभाऱ्‍यातील मुर्ती देवाची.
तोल सावरता सावरता, ऐकली वाणी पुजाऱ्‍याची.
म्हणे एवढीच वेळ असते अर्ध्या नारळाची.

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

चारोळी ४

ओळखलय मी या जगाला.
रित आहे याची, संपली गरज हो बाजुला.
एवढच काय जेव्हा सोडतो श्वास ह्रदयाला,

कोणी "आपला"च येतो पेटवायला.

रविवार, २९ ऑगस्ट, २०१०

चारोळी ३

जेव्हा जेव्हा शोधली मी यशाची गुरुकिल्ली.
कोणीतरी आलचं कुलूप बदलायला.
आता मात्र मी मार्ग बदललाय,
शिकलोय दरवाजेच उध्वस्त करायला.

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

चारोळी २

त्या मंतरलेल्या कातरवेळेला,
एकटाच होतो तुझ्या आठवणीत बुडलेला.
शेवटी दया आली त्या वेड्या पावसाला,
अन् सोबत केली त्याने माझ्या डोळ्यातील आसवांना...!!!

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

चारोळी १

वाटल मलाही, मागावं काहीतरी.
पाहुन एक तारा गळताना.
बंडखोर मन म्हटलच लगेच.
अरे काय देईल तो तुला,
जमत नाही ज्याला स्वतःलाच सावरायला.

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

बालपण

होता एक मामाचा गाव, तो भातुकलीचा डाव.
पावसाची चिंब सर अन् कागदाची नाव.
भावंडाशी भाडणं तर आईसाठी रडणं होतं.
कुठे आलो या तारुण्याच्या दलदलीत, खरच ते बालपण किती भाबडं होतं.

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

एकलव्य



नाही व्हायच कर्ण मला,नियतीच्या चाकात अडकणारा.
 नाही व्हायच अर्जुन मला, साम दाम दंड भेदाने युध्द जिंकणारा.
आवडेल मला "एकलव्य" व्हायला सर्वस्व गमावूनही जगाला जिंकणारा